जोरदार पावसातही सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील चिलख्याच्या बांधाऱ्यावर,अतिवृष्टीमुळे अडकलेल्या तीन मजुराची सुखरूप सुटका

चाकूर : 27 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या तीन मजुरांची सुटका करण्यासाठी भर पावसात सहकार मंत्री चिलख्याच्या बांधाऱ्यावर उपस्थिती राहून एनडीआरएफ व अहमदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आज शनिवार दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.50 वाजता तिन्ही मजुरांची सुखरूप सुटका केली. या रेस्क्यू कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे बंधाऱ्यावर काम करणारे तीन मजूर अडकले होते.या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी संपर्क करून एनडीआरएफ यांची टीम त्या ठिकाणी रवाना केली होती. राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील स्वतः प्रचंड पावसामध्ये चिलखा येथे दाखल होऊन ते मजूर सुखरूप बाहेर निघेपर्यंत त्याठिकाणी ठाण मांडून बसले होते.
आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना एनडीआरएफ व अहमदपूरच्या स्थानिक पोलिसांनी यशस्वीपणे बाहेर काढले आहे .या कार्यात सहकार मंत्री यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.


